जिल्हाधिकाऱयांना निवेदन : वास्तव्यासाठी 12 गुंठे जागा देण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
हिंदवाडी येथील सर्वोदय कॉलनी हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत शुक्रवारी तेथे काही अधिकारी गेले होते. येथील घरे सोडा, असे ते सांगत होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी विरोध केला. लॉकडाऊन काळात येथील कुटुंबे जाणार कोठे? तेव्हा त्यांना त्या ठिकाणी राहण्यास मुभा द्या, अशी मागणी वकिलांनी आणि सर्वोदय कॉलनीतील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या 50 वर्षांपासून आम्ही या ठिकाणी राहत आहे. अचानकपणे आम्हाला नोटिसा देण्यात आल्या आहेत. आम्ही सर्व दलित कुटुंबे आहोत. त्यामुळे आम्हाला इतर कोठेही जमीन नाही. तेव्हा सध्या आम्ही असलेली 12 गुंठे जागा द्यावी व इतर जागेत तुम्ही विकास करा. त्याला आमचा विरोध राहणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाकाळात घरे सोडा, असे सांगण्यात येत आहे. मात्र जिल्हा प्रशासन घरातून बाहेर पडू नका, असे सांगत असताना अशाप्रकारे दमदाटी करणे योग्य नाही. 21 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतरही आम्हाला इतरत्र जाणे अशक्मय आहे. तेव्हा येथून आम्हाला हटवू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. एन. आर. लातूर, ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. मारुती कामाण्णाचे, मल्लेश चौगुले, शहीना जहागीरदार, श्रीमती भोसले, यशवंत लमाणी, ऍड. एम. एस. पाटील, उदय कोलकार, अजय पुजारी, अशोक शिंदे, दीपक बिजगर्णी, गोपी बळ्ळारी, जाफर कालेखाजी, फकिराप्पा तळवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.