प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दोन आठवठय़ात शनिवार व रविवारी बससेवा ठप्प झाली होती. मात्र शासनाने शनिवार-रविवारचा विकेंड कर्फ्यू मागे घेतल्याने शनिवारी बसस्थानकातून सर्व प्रकारची बससेवा सुरळीत सुरू झाली. विकेंड कर्फ्यूकाळात बससेवा ठप्प झाल्याने परिवहनच्या महसुलावर परिणाम झाला होता.
बेळगाव बसस्थानकात विविध ठिकाणी प्रवास करणाऱया प्रवाशांची वर्दळ वाढली होती. उचगाव, येळळूर, अनगोळ, वडगाव, होनगा, काकती, हंदिगनूर, राजगोळी, कट्टणभावी, मण्णिकेरी, अतिवाड, मुचंडी, सुळेभावी, सांबरा, हलगा, अलारवाड, कंग्राळी बुद्रुक, बोकनूर, राकसकोप, गोल्याळी, बडस आदी बससेवा सुरळीत सुरू होती. मागील दोन आठवडय़ात शनिवार आणि रविवारी दोन दिवस बससेवेवर मोठा परिणाम झाला होता. प्रवाशांअभावी मोजक्मयाच बस धावल्या होत्या तर काही बस थांबून होत्या. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. मात्र शनिवारी बससेवा पूर्ववत झाली आहे.
मागील दोन वर्षांत कोरोना, लॉकडाऊन, आंदोलन, दगडफेक इतर कारणांनी बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. विकेंड कर्फ्यूमुळे विस्कळीत झालेली बससेवा सुरळीत झाली असून ग्रामीण भागातील वस्तीची बससेवादेखील पूर्वपदावर आली आहे. शाळा, बाजारपेठ व इतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. वस्तीच्या बससेवा सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. दरम्यान रात्री उशिराने प्रवास करणाऱया प्रवाशांची सोय झाली आहे.