बेंगळूर : सर्व मागासवर्गीय समुदायांच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. दावणगेरे जिल्हय़ाच्या बेळ्ळोडी येथे बांधलेल्या नूतन विद्यार्थी निलय, समुदाय भवन आणि मुख्य महाद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्व समुदायांच्या विकासासाठी सरकारने विविध योजना आखल्या असून आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यापेक्षा अधिक वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. हालुमत समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कुलशास्त्रींच्या अध्ययनाचा अभ्यासासाठी उच्चस्तरिय समितीची रचना करण्यात आली आहे. लकवरच याचा अहवाल मिळणार आहे. याचबरोबर एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा मोठय़ा मतांच्या अंतराने विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Previous Articleउरली ना जखमांची नवलाई, जिंकायचीय उद्याची लढाई!
Next Article राज्यात 39,092 सक्रिय रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.