प्रतिनिधी / सांगली
कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आज दि. १३ जुलै २०२१ पासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रस्त्याकडेचे खाद्यपदार्थ विक्रेत्यावर बंदी घालण्यात आली आहे. मैदाने उद्याने आदी. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. लग्न आणि अन्य समारंभांना दोन तासापेक्षा जास्त वेळ परवानगी देण्यात येणार नाही.
त्याच बरोबर किराणामाल फळे भाजीपाला दूध डेरी बेकरी विक्रेत्यांना घरपोच सेवा द्यावी लागणार आहे. 19 जुलैपर्यंत हा देश लागू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले आहेत.