प्रतिनिधी / इस्लामपूर
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तसेच विविध संघटना, सामाजिक संस्थाकडून जनता कर्फ्यूची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर इस्लामपूर नगरपालिकेच्या सभेत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवार दि. ५ मे ते ९ मे पर्यंत असा पाच दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
शहरात सध्या ३०० हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या कालावधीत मेडिकल दुकाने, आरोग्य व्यवस्था या सर्व नियमावलींचे पालन करुन सुरु राहतील. दूध डेअरी व दूध विक्रेते यांना सकाळी १० वाजेपर्यंत संकलन व घरपोहच वितरणाकरीता मुभा राहिल. तसेच शहराच्या सर्व सीमा नागरिकांच्या तपासणी करता व हालचालीवर मर्यादा आणण्याकरिता बंद करण्यात येणार आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तहसीलदार रविंद्र सबनिस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पक्षप्रतोद विक्रम पाटील, गटनेते संजय कोरे उपस्थित होते.