367 कोरोनामुक्तः सांगली शहरात 135 वाढलेः आटपाडी, जत आणि मिरज तालुक्यात 100पेक्षा अधिक रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात एक हजार 90 रूग्ण वाढले आहेत. तर जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. उपचार सुरू असणाऱया 19 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर नवीन रूग्णवाढीचा वेगही वाढला आहे. नवीन एक हजार 90 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 135 तर मिरज शहरात 68 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 367 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात आठ हजार 331 रूग्ण आहेत. सलग तिसऱया दिवशी आटपाडी, जत आणि मिरज तालुक्यात 100 पेक्षा अधिक रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत वाढच होत चालली आहे.
महापालिका क्षेत्रात 203 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मंगळवारी महापालिका क्षेत्रात नवीन 203 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 135 तर मिरज शहरात 68 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 20 हजार 296 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 78 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात तब्बल 887 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर एकाच दिवशी तब्बल 887 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी, जत आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक असे 100 पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. आटपाडी तालुक्यात 105 तर जत तालुक्यात 102 रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात सर्वाधिक असे 145 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 80 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 92 रूग्ण वाढले. पलूस तालुक्यात 56, तासगाव तालुक्यात 98 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 59 तर वाळवा तालुक्यात 97 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात 53 रूग्ण आढळून आले आहेत.
19 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात मंगळवारी तर उंच्चाकी मृत्यू झाले आहेत. एकाच दिवशी 19 जणांना कोरोनाने प्राण गमावावे लागले आहेत. महापालिका क्षेत्रात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगली शहरातील तीन आणि मिरज शहरातील एकाचा जणांचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यात तीन रूग्ण दगावले आहेत. कडेगाव तालुक्यात एक तर तासगाव तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात तीन, मिरज तालुक्यात दोन पलूस तालुक्यात एकाचा तर वाळवा तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 969 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.72 टक्के झाला आहे.
367 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 367 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 63 हजार 177 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 52 हजार 877 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 1090
उपचारात 8331
बरे झालेले 52877
एकूण 63177
मृत्यू 1969
मंगळवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 105
कडेगाव 80
खानापूर 92
पलूस 56
तासगाव 98
जत 102
कवठेमहांकाळ 59
मिरज 145
शिराळा 53
वाळवा 97
सांगली शहर 135
मिरज शहर 68
एकूण 1090
लसीकरण
आजचे लसीकरण 10772
आजअखेर लसीकरण 430772