प्रतिनिधी/मिरज
तालुक्यातील ढवळी आणि एरंडोली येथे ऊसतोडीसाठी आलेल्या मजूरांच्या झोपड्यांमध्ये चोरी करुन चोरट्यांनी आठ मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी विठ्ठल केशव कांबळे (वय 47, रा. माजलगांव, ता. बीड) आणि विजय मुकेश भिल्ल (रा. मुक्ताईनगर, जळगांव) या दोघांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.