शेतकरी आक्रमक ; हरिण, बिबट्याचा बंदोबस्त करा
वार्ताहर / देवराष्ट्रे
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील बिबट्या बाहेर पडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अभयारण्यातील हरणे शेतपिकांचे प्रचंड नुकसान करत आहेत. शेतात जाणे मुष्कील झाले आहे. त्यामुळे अभयारण्य परिसरात असणाऱ्या बिबटया व हरिणाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी करित देवराष्ट्रे येथील शेतकऱ्यांनी अभयारण्याच्या काऱ्यालयासमोर दोन तास ठिय्या मारला. यावेळी आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकण्याचा इशारा देवराष्ट्रे येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
एक वर्षापुर्वी अभयारण्याच्या ट्रॅप कॅमेरात अभयारण्यात
बिबट्या असल्याचे दिसुन आले. परंतु काही कालावधीनंतर अभयारण्य परिसरातील शेतकऱ्यांना हा बिबट्या अभयारण्या बाहेर निर्दशनास आला. शुकवारी सायंकाळी ऊस पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या सुनील विनायक शिंदे या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. तसेच अभयारण्याच्या तुटलेल्या कुंपनातुन बाहेर पडुन हरणेही शेतपिकाचे मोठे नुकसान करत आहेत. याचबरोबर अभयारण्यातील रानडुक्कर, साळिंदर, मोर वानर ससा या वन्यप्राण्यांकडुनही शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अभयारण्याच्या काऱ्यालयासमोर ठिय्या मारत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी आठ दिवसात कुंपन दुरूस्ती करुन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास अभयारण्याला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.