उदय सावंत/वाळपई
सध्या सत्तरीतील धनगर बांधवांच्या अस्तित्वाच्या प्रश्नासंदर्भात अनेक स्तरावर प्रश्न निर्माण झालेले आहेत. निज गोयकार अर्थात याभूमीचे पुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱया धनगर समाजाला पूर्णपणे आदिवासी असल्याचे समजण्यात येत आहे .यामुळे रानात राहणारा धनगर बांधव हा विकासाच्या प्रवाहापासून बऱयाच अंतरावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गोवा मुक्तीनंतर अनेक ठिकाणी या धनगर बांधवाच्या वस्तीवर विकासाचा प्रकाश पडल्याचेही पहावयास मिळत आहे. मात्र सत्तरी तालुक्मयातील नगरगाव पंचायत क्षेत्रांमधील साटे यागावापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर पूर्णपणे गर्द झाडीमध्ये गेल्या चार पिढय़ांपासून अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आपले जीवन व्यथित करणाऱया बोमो शेळके या कुटुंबाच्या आधारावर मात्र अजून पर्यंत काळाकुट्ट अंधार असल्याचे पहावयास मिळत आहे. या बांधवांच्या जीवनाला आजही अनेक दु:खाचे पदर असल्याचे एकूण प्राप्त माहितीनुसार समजते. सदर पदर टप्प्या टप्प्यातून समाजासमोर आणून सरकारच्या यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न “तरुण भारत” च्या माध्यमातून करण्यात येणार आहे यामुळे आजच्या पहिल्या टप्प्यातून या समाजाने आतापर्यंत कशाप्रकारे संघर्ष केलेले आहेत या संदर्भाची टिप्पणी करण्यात येणार आहे.
होय आमचा संघर्ष गेल्या चार पिढय़ांपासून
साटे गावापासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारा बोमो शेळके व त्यांचे कुटुंबीय आज अनेक प्रकारच्या संघर्षांना समर्थपणे तोंड देत आहे. मात्र समोर येणाऱया अडचणी यांना प्रकर्षाने सामोरे जात अनेक अडचणीवर त्यांनी मात केलेली आहे. मात्र आजही त्यांच्या समोर अनंत अडचणी आहेत ज्याच्यावर ते सरकारच्या मदतीविना मात करू शकत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. जवळपास 80 वर्षाच्या आसपास असलेला बोमो हा धडधाकट देहवृष्टीचा आहे .दिवसभर काबाडकष्ट करून चोहोबाजूने घनदाट जंगलाने वेढलेले त्यांचे पारंपरिक स्वरूपाचे घर व या घरांमध्ये पूर्णपणे आदिवासी स्वरूपाची जीवनशैली असल्याचा नजराणा पहावयास मिळतो.
होय गेल्या चार पिढय़ांपासून शेळके कुटुंबीय ह्या घनदाट जंगलाची मैत्री करून राहत आहे .आज शेळके कुटुंब आणि नैसर्गिक संपदा यांचे भावपूर्ण नाते जोडले गेले आहे. निसर्गाशी एक रूप राहून पर्यावरणाचा सांभाळत करत चार पिढय़ांपासून आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेला जगण्याचा मंत्र आजही आम्ही स्वाभिमानाने जपत असल्याचे उद्गार शेळके काढतात. गोवा राज्य हे खऱयार्थाने विकासाच्या बाबतीत गतीने पुढे जाताना दिसत आहे. मात्र शेळके कुटुंबाला ना विकासाचा अर्थ कळत नाही किंवा नेमका विकास म्हणजे त्यांची संकल्पनाच वेगळी आहे.
बोरीमळ पाशाणी डोंगर हा सुरक्षितता पाठीराखा
ज्या ठिकाणी या शेळके बांधवांची आदिवासी स्वरूपाची घरे आहेत त्यांच्यामागे जवळपास शंभर मीटर उंच असा पाषाणी स्वरूपाचा डोंगर आहे. एका बाजूने याडोंगराने वक्रदृष्टी फिरविल्यास या शेळके कुटुंबाला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार हे खरे असले तरी हा आमचा खऱया अर्थाने पाठीराखा आहे. आतापर्यंत अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देण्याचे सामर्थ्य यापाषाणी डोंगरांनी आम्हाला दिले असल्याच्या भावना शेळके हा अभिमानाने व्यक्त करतो .अनेक प्रकारची वादळे आली मात्र या पाशाणी डोंगराने आम्हाला कधीही त्रास दिला ना भय निर्माण केला. यामुळे हा पाषाणी डोंगर खऱयार्थाने आमचा पाठीराखा असल्याच्या भावना व्यक्त करतो.
अनेक प्रकारच्या ज्वलंत समस्या.
आज या शेळके कुटुंबासमोर अनेक प्रकारच्या ज्वलंत समस्या आहे .त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे या कुटुंबाने निसर्गाशी निर्माण केलेले आपुलकीचे नाते जरी असलेतरी पट्टेरी वाघ यामुळे यांना आतापर्यंत अनेक प्रकारच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागले आहे. आठ दिवसांपूर्वी याच कुटुंबाची एक गाय वाघाने मारली होती. यापूर्वी गेल्या दहा वर्षांत पंधरापेक्षा जास्त गुरांची शिकार वाघाने केल्याचे शेळके कुटुंबीय सांगतात. मात्र त्यांना अजूनही हा भाग म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात येत असतानाही त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. किंबहुना अशा प्रकारची आर्थिक मदत मिळते याची साधी आठवण त्यांना नाही. म्हणजे वनखात्याची यंत्रणा अशा या निसर्गाच्या भुमिपुत्राला अशा प्रकारच्या योजनेच्या थांगपत्ताही लागू देत नाही हेच खरे दुर्दैव म्हणावे लागेल..
ना वीज ना पाणी हाच का विकास.
आपल्या विकासाची संकल्पना काय अशाप्रकारचा प्रश्न निर्माण झाला तर प्रत्येक माणसाला वीज पाणी व निवारा हा त्यांच्या मूलभूत गरजा असतात. मात्र या गरजा प्राप्त करण्यासाठी शेळके कुटुंबाला अनंत स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेळके कुटुंबीय हे गावापासून जवळपास साडेतीन किलोमीटर अंतरावर पूर्णपणे गर्द झाडीमध्ये वसलेले आहे. यामुळे त्यांना विजेचा आनंद अजूनही घेता आलेला नाही. आज अनेक ठिकाणी आपण स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत माता शेळके कुटुंबीयांना नैसर्गिक स्तरावर पाण्याचा आधार हेच त्यांचे जीवन आहे. महत्त्वाचे म्हणजे घरापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर तेसुद्धा समोरच्या डोंगराच्या उभ्या कडय़ावर हे पाणी आहे. उत्तमपणे तंत्र वापरून शेळके कुटुंबीयाने जवळपास 1000 मीटर पाइपचा वापर करून दुसऱया डोंगरावरून त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.