कराराचा केला भंग, हात नेमके कोणाचे झाले बरबटले, खुल्या जागेत बांधकाम कसे झाले
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरातभर वस्तीत पालिकेची खुली जागा भाडय़ाने देण्याचा ठराव 5 जून 1975 च्या पालिकेच्या सभेत रात्री 9 वाजता झाला होता. त्याच ठरावानुसार लिलावाची प्रत्यक्ष प्रक्रिया दि.7 नोव्हेंबर 2001 ला झाली. दोन्ही पंप मालकांनी नाममात्र भाडे कराराने ती जागा घेतली. तब्बल 16 अटी त्या करारात होत्या. खुल्या जागेमध्ये कोणताही बदल करता येणार नाही असे त्यात म्हटले होते. परंतु आता त्यामध्ये खुल्या जागेत बांधकाम करता येणार नाही, तीन वर्षानंतर करार संपूष्टात येईल, असे म्हटले होते.
परंतु सर्व नियम मोडीत काढून पंप चालकांनी पालिकेची जागा ढापली गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून नगरविकास विभागाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दि.3 मे रोजी नोटीस बजावून 48 तासात जागा खुली करुन देण्यात यावी असे म्हटले होते. अद्यापही ती जागा परत दिली नाही. सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी पुन्हा पालिकेला स्मरणपत्र दिले आहे. ही जागा पंप चालकाने ढापली असून पालिकेने ती परत घ्यावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.