16 कोटी 53 लाख रुपयांची आतापर्यंत वसुली
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात मार्च एण्डींग पूर्वी थकबाकीदारांची कर वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी वसुली विभागाच्या सातत्याने बैठका घेवून सुचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार वसुली विभागाकडून कामकाज सुरु आहे. कालपर्यत 16 कोटी 53 लाख रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. ज्यांची मोठी थकबाकी आहे, अशा लोकांच्यावर जप्तीची कारवाई सुरु करण्यात आलेली असून वसुली मोहिमेतचा धडाका सुर केलेला आहे. दिलेले उद्दीष्ठ गाठण्यासाठी वसुली विभागाची पथके शहरातील थकबाकीदारांच्या कारवाई करत फिरत आहेत.
सातारा शहरात सुमारे 32 हजार मिळकतधारक आहेत. या सर्व मिळकताधारकांमध्यें सुमारे 8 हजार मिळकतधारक हे मोठय़ा रक्कमेचे थकबाकीदार आहेत. जे बडे थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करताना पालिकेच्या वसुली पथकास अडचणी येतात म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी वसुली विभागास अधिकार देवून टाकले आहेत. त्यानुसार शहरात जोरदारपणे कारवाई सुरु करण्यात येत आहे. ज्यांनी कर वेळेवर भरला नाही अशांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु केली आहे. नेमण्यात आलेली पथकांमध्ये प्रशांत खटावकर, अतुल दिसले आणि श्रीमती जाधव अशा तिघांच्या अखारित्य प्रत्येक प्रभागाकरता एक पथक कार्यरत आहे. मार्च एंण्डीग जवळ आला असून केवळ तीन दिवस उरले आहेत. तीन दिवसांमध्ये दिलेले टार्गेट पूर्ण करायचे असल्याने सर्वच वसुली विभाग कामाला लागला आहे. अगदी बडया धेंडांवरही कारवाई सुरु केलेली आहे.
थकबाकीदारांना सुट्टी नाही
मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी वसुली विभागास सक्त ताकिद दिली ओह. कितीही मोठा थकबाकीदार असू द्या. त्याच्यावर कारवाई करुन वसुली झाली पाहिजे, अशा सुचना केल्याने पथके पायाला भिंगरी लावून पळत आहेत.