आणखी किती पाहणार अंत, वाहनधारकांचा संतप्त सवाल
प्रतिनिधी / सातारा
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे पडलेले आहे. मुंबई, पुण्यावरून आलेले गणेश भक्त दीड दिवसाचे गणेश विसर्जन करुन परत चालले आहेत. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्यात वाहनाचे टायर फुटण्याचे आणि अपघाताच्या घटना घडत आहेत.
रविवारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास शेंद्रे येथे खड्यात दुचाकी पडून अपघात घडल्याची घटना घडली. जखमी दुचाकी चालकास लगेच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेची पोलिसात नोंद झाली नसून आणखी किती अंत पाहणार असा सवाल वाहनधारक विचारू लागले आहेत.