वाढत्या कोरोना काळात आई, वडिलांना आधार
सातारामध्ये नियम पाळले तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अश्विनीने शक्यता व्यक्त केली
प्रतिनिधी / सातारा
चीनच्या ज्या वुहान शहरात कोरोनाची कहर सुरू होता. त्याचवेळी सातारा शहरातली अश्विनी पाटील तेथे 33 दिवस अडकली होती. तेथून तिची सुटका सुखरूप केली. आज तिच्या त्या वुहानमधल्या आठवणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत चालेला आकडा पाहून जाग्या झाल्या. ती आपल्या मायदेशी, आपल्या आई-वडिलांच्याजवळ असल्याने तिलाही आणि त्यांनाही आधार झाला आहे. प्रशासन प्रयत्न करतेच आहे पण सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी नियम पाळले तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असे अश्विनी पाटील हिने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
ज्या देशातून कोरोनाची सुरूवात झाली. त्या चीनच्या वुहान शहरात अब्रॉड येथे आपल्या पतीसोबत अश्विनीने दोन महिने काढले. त्यातील 33 दिवस हे लॉकडाऊनचे होते. या लॉकडाऊनमध्ये ना तिला चीन भाषा येत होती, ना समजत होती. फक्त भारतीय इंग्रजी भाषा तिला समजत होती. फेब्रुवारी महिन्यात ती भारतात सुखरूप आली. दिल्ली आणि सातारा येथे क्वारंटाइन झाल्यानंतर ती आपल्या कुटूंबात रुजली.
आज सातारा जिल्ह्याने 30 हजारांचा आकडा केल्यावर सहा महिन्यांनी तिथले आणि इथले वातावरण तिथले लॉकडाऊन व इथले लॉकडाऊन याबाबत निश्चित कडू आठवणी तिने जागवल्या. शेवटी स्वतःचा देश, स्वतःच घर, स्वतःच गाव हेच हक्काचे असते. ती म्हणते की, मी या काळात बाहेर असते तर माझ्या आई-बाबांची मला खूप काळजी वाटली असते. ते नीट मास्क लावतात की नाही, स्वच्छ हात धुतात की नाही, पण आता जवळ असल्याने मीच सार करते. त्यांचा आधार वाटतो. पतीशी व्हाट्सअपवर दररोज बोलणं होत असत. दिवाळीत जाण्याचा मनोदय आहे. शेवटी आई वडिल जवळ असावे वाटतात, असे तिने सांगितले. पुढे, सातारा जिल्ह्यात कोरोना कमी येऊ शकतो. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेले मास्क नियमानुसार वापरले गेले पाहिजेत. सामाजिक अंतर पाळले गेले पाहिजे. तरच कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी शक्यता तिने वर्तवली. माझा आता पासपोर्ट आला असून त्याकरता पुण्याला जावे लागले होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घराबाहेर पडत नाही, असे ही तिने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.