व्हायरल होत असलेला मेसेज ही अफवाच
जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वृत्त पसरवू नका जिल्हाधिकार्यांचे आवाहन
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्राणवायु पुरवठा करावा लागत आहे. त्यात कोणताही खंड पढू दिला जाणार नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
सध्या समाज माध्यमातून सातारा जिल्ह्याला कृत्रिम प्राणवायुचा पुरवठा बंद केला जाईल असे एका पत्राचा हवाला देऊन बातम्या दिल्या जात आहेत. ती प्रशासकीय तांत्रिक बाब असून त्यातून प्रशासनाने मार्ग काढला असून पूर्वीसारखाच पुरवठा सुरु राहिल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे चिंता करू नये. जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वृत्त पसरवू नये असे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.