सातारा : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांमधील 80 टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळत आहेत. त्यातही महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, पुणे आणि सातारा हे जिल्हे हॉटस्पॉट ठरले आहेत. या जिल्ह्यांमध्ये नवीन स्ट्रेन आल्याची चर्चा सुरू असतानाच यवतमाळ, अमरावतीमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रिव्ह्यूव मीटिंगमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली.
सोमवारपासूनच (दि.22) सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली. बाधितांचे आकडे याप्रमाणेच वाढत राहिले तर 28 फेब्रुवारीला सातारा जिल्हा पूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत मिळत आहेत.