प्रतिनिधी / सातारा
गेल्या चार दिवसांपूर्वी सातारा शहरातील 22 ठिकाणी बॅरिकेट्स प्रशासनाने लावलेली आहेत. मात्र, ही बॅरिकेट्स केवळ नुसती उभी आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत या बॅरिकेट्सचा खुळखुळा झालेला असतो. नागरिक बिनधास्तपणे या बॅरिकेट्समधून येजा करताना दिसतात. अगदी पोलिसही या बॅरिकेट्समधून जाताना दिसतात. त्यामुळे नावालाच हे बॅरिकेट्स आहेत.
शहरातील वाढत चाललेला कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने गेल्या चार दिवसांपूर्वी संपूर्ण शहरातील सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहे. त्याकरता मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वतः पाहणी केली होती. त्यावेळी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हेही उपस्थित होते. मात्र, त्याच बॅरिकेट्सचा वापर होत नसून नागरिक त्या बॅरिकेट्स खालून जाताना दिसत आहेत. त्यामुळे नावाला बॅरिकेट्स लागलेल्या आहेत.