प्रतिनिधी / सातारा
केंद्र सरकारने लागु केलेल्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाचे राजधानी दिल्लीत गेली आठ दिवस शेतकरी बांधवांचे जे आंदोलन सुरू आहे. याला महाराष्ट्रातुन ही मोठा पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजु शेट्टी याच्या सुचनेनुसार सातारा येथे रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी जागर आंदोलन सुरू केलं. रात्रभर भजन कीर्तन करून केले जाणार आहे. असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी स्पष्ट केले.