एनजीटीसमोर झाली सुनावणी
वृत्तसंस्था/ सुंदरवन
सुंदरवनमध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करत तयार करण्यात आलेले हॉटेल पाडविण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पश्चिम बंगालच्या अधिकाऱयांना दिला आहे. सुंदरवनमध्ये हॉटेल निर्मितीच्या अनुमतीशी संबंधित एका प्रकरणी एनजीटीसमोर सुनावणी झाली. या हॉटेल निर्मितीवर पश्चिम बंगाल राज्य किनारी क्षेत्र व्यवस्थापनाने आक्षेप घेतला होता.
सुंदरवन किनारी विनियमन क्षेत्र अधिसूचनांच्या अंतर्गत तेथे कुठल्याही बांधकामाची अनुमती नसल्याचे एनजीटीचे प्रमुख ए.के. गोयल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. पश्चिम बंगाल राज्य किनारी क्षेत्र व्यवस्थापनाची भूमिका योग्य असल्याचे मानत प्रकल्प प्रस्तावकाकडून करण्यात आलेले बांधकाम अवैध घोषित करत आहोत. पश्चिम बंगाल राज्य किनारी क्षेत्र व्यवस्थापन, जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि वरिष्ट पोलीस अधीक्षकांच्या संयुक्त समितीने 3 महिन्यांच्या आत हे अवैध बांधकाम जमीनदोस्त करावे असे खंडपीठात सामील तज्ञ सदस्य ए. सेंथिल वेल यांच्यासह न्यायाधीश सुधीर अग्रवाल आणि बी. अमित स्टालेकर यांनी म्हटले आहे.
सुंदरवनातील कांदळवनं किनारी क्षेत्रातील जीवन आणि संपत्तीचे रक्षण करतात. किनाऱयानजीक क्राँक्रिट बांधकामामुळे भूगर्भीय वैशिष्टय़े बदलतात आणि कांदळवनांना नुकसान पोहोचवित असल्याचे खंडपीठाने नमूद केले आहे.
प्रकल्प प्रस्तावकाने अवैध स्वरुपात एप्रिल 2019 मध्ये बांधकाम सुरू केले होते, परंतु जुलै 2021 मध्ये पहिल्यांदा पोस्ट फॅक्टो सीआरझेड मंजुरी मागितली होती.