वृत्तसंस्था / ईटानगर
अरुणाचलप्रदेशच्या तिरप जिल्हय़ात सैन्याकडून चुकून झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी चासा गावात घडली आहे. नोक्फ्या वांगदान आणि रामवांग वांगसू हे दोन ग्रामस्थ एका नदीतून मासे पकडून परतत असताना त्यांना गोळय़ा लागल्या. सैन्याने दोन्ही ग्रामस्थांना उपचारासाठी डिब्रूगढच्या आसाम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखलमध्ये दाखल केले आहे.
जखमींपैकी एकाच्या हातामध्ये गोळी लागली, तर दुसऱयाच्या पायाला गोळीमुळे जखम झाली आहे. दोघेही धोक्याबाहेर असल्याचे डॉ. प्रशांत दिहिंगिया यांनी सांगितले आहे.