मंगळवेढा येथील दोन व्यक्ती जखमी, 18 गावे बाधित : डाळिंब, केळी, द्राक्ष, केळीचे नुकसान
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिह्यामध्ये 12 आणि 13 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे जिह्यातील 18 गावे बाधित झाली आहेत. यातील 83.25 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता आहे. 3800 शेतकरी बाधित असून दोन व्यक्ती जखमी झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी आज बुधवारी माहिती दिली
मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी व गारपीट पावसामुळे जिह्यातील शेतकऱयांचे फळपिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱयांच्या शेतातील नुकसान झालेला अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने 2300 हेक्टर क्षेत्रची पाहणी केली असून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, रब्बी ज्वारी पपई लिंबू आदी फळपिकांचे नुकसान झाले आहेत.
या अवकाळी पावसात जीवित हानी झालेली नसून मंगळवेढा येथील दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. अंशता 22 कच्च्या घरांची पडझड झाली आहे. तर 83.25 क्षेत्रातील फळपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे उत्तर-सोलापूर एक, बार्शी 3, अक्कलकोट एक, मोहोळ दोन, मंगळवेढा नऊ असे एकूण 18 गावे बाधित झाली आहेत.
पीक नुकसानीचे पंचनामे केले जातील
जिह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता आहे. लवकरात लवकर पूर्ण पीक नुकसानीचे पंचनामे केले जातील असेही जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.