प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळविल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात येत आहे. दरम्यान उजनी धरणातील आरक्षित, नियोजन केलेले पाण्यातून एक थेंब जरी मी पळविण्याचे सिद्ध झाल्यास आमदार, मंत्री पदाचा राजीनामा देऊ , इतकंच नाही तर राजकीय संन्यास घेऊ अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवन मध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी उजनीचे पाणी इंदापूरला वळविण्याच्या बद्दल माहिती दिली. उजनीच्या पाणी बद्दल राजकीय पुढारी राजकारण करीत आहेत. कोरोनाच्या काळात ही राजकारण करणे हे ठीक नाही. असे म्हणत उजनीचे पाणी मी पळविल्याचे सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेणार असेही स्पष्ट पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
पालकमंत्री बदला असे म्हणणाऱ्यांना ‘शुभेच्छा’
कोरोनाची भयंकर परिस्थिती असतानाही सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकमंत्री बदला अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील सह भाजपकडून मागणी होत आहे. याविषयी पालकमंत्र्यांना विचारल्यास ते म्हणाले पालकमंत्री बदला असे म्हणणाऱ्याना माझ्याकडून शुभेच्छा असेही भरणे यांनी सांगितले.
अजुन काय म्हणाले पालकमंत्री
सोलापूर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत रेमडीसिव्हीरचा तुटवडा भरून निघेल प्रसंगी हात पसरू
सोलापूरकरसाठी जे जे करणं शक्य आहे ते करणार
रेमडीसिव्हिरचा काळा बाजार केल्यास कारवाईचे आदेश
ऑक्सीजन , बेड, कोव्हिड केअर सेंटर जास्तीचे उभारणार