महामार्गावर रस्त्याला खिंडार पडल्याने धोका
बाळेपुंद्री / वार्ताहर
सौंदत्ती व परिसरातील चिपुंबी, उगरगोळ भागाला रविवारी दुपारी दोन तास वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. परिणामी सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सौंदत्ती शहरातील नाले, गावागावांतील ओढय़ांना पूर आल्याने काही काळ जनजीवन ठप्प झाले होते.
सौंदत्तीनजीक असलेल्या नवलूरमार्गे धारवाडला जाणाऱया राज्य महामार्गावरच रस्ता खचल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच बायपास रस्त्यावर मातीचा ढिगारा कोसळला असून महामार्गाच धोकादायक बनला आहे. पेलिसांनी रस्त खचलेल्या ठिकाणी खबरदारी म्हणून बॅरिकेड्स लावले आहेत.