ऑनलाईन टीम / जेद्दाह :
सौदीमध्ये लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या 450 भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांची रवानगी डिटेंन्शन कॅम्पमध्ये करण्यात आली आहे. भारतीय दूतावासानेया कामगारांची मायदेशी परत जाण्याची व्यवस्था करावी, असे संकेत सौदी सरकारने दिले आहेत.
महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि काश्मीरमधील मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार सौदीमध्ये आहेत. त्यामधील काही कामगारांचा काम करण्याचा परवाना संपलेला आहे. हाती काम नसल्यामुळे त्यांना भारतात परतण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
यासंदर्भात अमजद नामक एका भारतीय कामगाराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने भारत सरकारला आवाहन केले आहे की, ‘माझ्या भावाचा मृत्यू झाला असून, आईची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे मला पुन्हा भारतात परतायचे आहे.’ त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी आणि सौदी अरेबियातील भारतीय राजदूत औसाफ सईद यांनाही पत्र लिहून तिथे अडकलेल्या सर्व भारतीयांसाठी मदत मागितली आहे.