नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षात 14000 उमेदवारांना भरती करून घेण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भातली योजना बँकेने आखली असल्याचे समजते. स्टेट बँक लवकरच ‘व्हीआरएस’ योजना राबवणार असून 30 हजार 190 कर्मचारी याकरीता पात्र असल्याचे सांगण्यात येते. खर्चात कपात करण्याकरता व्हीआरएसची योजना राबवली जात नसल्याचा खुलासा स्टेट बँकेने केला आहे. बँकेला येणाऱया काळामध्ये व्यवसाय विस्तार करायचा असून त्याकरता आवश्यक ते मनुष्यबळ घ्यावे लागणार आहे. त्यादृष्टीनेच बँकेने यंदा वषी 14 हजार कर्मचारी भरती करून घेण्याचे ठरवले आहे. स्टेट बँकेत सध्याच्या घडीला अंदाजे 2 लाख 50 हजार इतके कर्मचारी असल्याचेही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.