विद्येनेच’ ये श्रे÷त्व या जगामाजी !
शाळेच्या भिंतीवर विद्या शिकता शिकता हा सुविचार हजार वेळा वाचला आहे ; पण जग म्हणजे काय आणि त्यातश्रे÷त्व मिळणे म्हाणजे काय हे काहीच माहीत नव्हते.अभ्यासक्रमात जगाचा भूगोल होता पण जगातलं जगणं नव्हतं.
हे शिकवायला ‘विद्याच’ मदतीला आली.
आमच्या विद्याताई !
विद्याताई बाळ !!
त्या आपला निरोप घेणार याची धाकधूक गेल्या काही आठवडय़ापासूनच लागलेली होती पण मन त्यांना निरोप द्यायला तयार होत नाही.
कोण लागतात त्या माझ्या?
आई? मैत्रीण? मोठी बहीण?
सगळंच.
फार उंचावर असूनही सहज हिरवळीवर हात फिरवावा तशा मायेनं डोक्मयावर हात ठेवून बोलल्या आहेत त्या.
कधी झाली पहिली ओळख ?
1972/ 73 सालात मी दहावी अकरावीत असताना स्त्री मासिकाचे काही अंक माझ्या वाचनात आले.
विधवा स्त्रियांनी कुंकू लावणे, लग्न झालेल्या स्त्रियांनी नावाआधी सौ.न लावणे अशी मतं असलेले अंक तेव्हा माझ्यासारख्या मध्यमवर्गीय पांढरापेशा घरात चोरूनच वाचावे लागत. या विषयाचे गांभीर्य समजण्याचेच काय अर्थही समजण्याचे माझे वय नव्हते. कुवत तर नव्हतीच नव्हती. पण विद्या बाळ या संपादकाने माझ्यातला ’माणूस ’ हलवायला सुरूवात केली होती एवढं निश्चित.
लग्न झाल्यावर चोरून करायची ही गोष्ट मी राजरोस करायला लागले. विद्याताईंचे लेख मिळतील तिथून वाचायला लागले. माझ्या घराबाहेरही माझी एक स्वतःची ओळख असली पाहिजे, ही तहान विद्याताई जागवत होत्या.
शिक्षण, स्वावलंबन या बाबी लिंगनिरपेक्ष आहेत. स्त्री- पुरूष यांनी परस्परांशी संवाद साधला पाहिजे ही विद्याताईंची तळमळ होती. फार मोठा मानसिक आणि सामाजिक संघर्ष केला त्यासाठी त्यांनी. आम्हा स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने रहायला उद्युक्त केलं… विरोधात नव्हे ! तरीही काही करंटय़ा लोकांनी विद्याताईंना घरं फोडणाऱया, संसार मोडणाऱया अशी विशेषणं लावली. अर्थात विद्याताईंनी कुठे लक्ष दिलं त्यांच्याकडे? त्यांना वेळ तरी कुठे होता?
समाजवादी विचारसरणी, तिचे गुणदोष या बद्दल मला काहीच बोलायचं नाही. मला फक्त विद्याताईंनी कायम माणूसपण अधोरेखित केलं एवढंच सांगायचं आहे.
मला आठवतंय,
इयत्ता दहावीच्या पुस्तकात ‘माणसाची किंमत’ हा गद्यपाठ होता. 1987 च्या सुमारास खारेपाटणच्या न.म. विद्यालयात मी दहावीला मराठी शिकवता होते, या पाठाच्या वेळी ते ग्रामीण भागातले विद्यार्थी भारावले होते.’लग्न’ हा नुसता भपका नव्हे किंवा नवरा मुलगा म्हणजे किंमतीचे लेबल हुंडय़ावर लावलेली वस्तु नव्हे हा विचारच त्यांना नवा होता.
धडा शिकवून झाल्यावर अख्ख्या वर्गाने ‘हुंडय़ाचा व्यवहार असलेलं लग्न आम्ही स्वीकारणार नाही!’ ही प्रतिज्ञा उभे राहून घेतलेली होती.
मला सांगायला अभिमान वाटतो त्या बॅचच्या बहुतांश मुलांनी ती प्रतिज्ञा पाळल्याचं मला मोठेपणी कळवलं. विद्याताईंचे विचार जिंकले होते. मुलांच्या मनातला माणूस त्यांनी सजग केला होता.
पुढे ‘मिळून साऱयाजणी’ हे मासिक 1989 साली त्यांनी सुरू केलं आणि आम्हाला हक्काची जागा मिळाली. स्त्री विश्वातल्या कानाकोपऱयातले विषय ऐरणीवर येत होते.
विद्याताईंना समाजभान होतं, अन्यायाविरोधात त्या शांतपणाने पण विलक्षण ठामपणाने बोलत. कांगावा किंवा आक्रस्ताळेपणा त्यांनी कधीच केला नाही. शनीशिंगणापूरचा लढा असो, किंवा नयनतारा सहगलना साहित्यसंमेलनात निमंत्रण नाकारणे असो त्या त्या वेळी विद्याताई व्यवस्थेवर खंबीरपणे तुटून पडल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिह्यातही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या अनेकदा आल्या आहेत. मी,डॉ. शमिता बिरमोळे, अर्पिता मुंबरकर, वंदना करंबेळकर, अर्चना वझे अशा आम्हा साऱयाजणींना विविध कार्यक्रमाची दिशा त्यांनी सतत दिलेली आहे. ‘ऐलमा पैलमा अक्षरदेवा’ या सिंधुदुर्गातल्या महिला साहित्यकी समुहाने माझ्या ‘पाच दशक नऊ सुटे’ या पुस्तकाचे प्रकाशन हिजडा प्रतिनिधी ‘दिशा शेख’ हिच्या हस्ते केले ते विद्याताईंच्याच प्रेरणेने. एलजीबीटी या स्त्रीपुरूषेतर समाजाबद्दल आपुलकीने विचार करायची नजर विद्याताईंनीच आम्हाला दिली.
मिळून साऱयाजणीच्या मुखपृ÷ावर पूर्वी स्त्री आणि पुरूष यांनी परास्परांशी संवाद साधावा यासाठी असे ‘ब्रीदवाक्मय’ असायचे, ते बदलून आता ‘ती’ आणि ‘तो’ या पलिकडचे सर्व ‘ते’ यांनी परस्परांशी नव्याने संवाद साधावा यासाठी…
असे नव्या जगाचा गुढीपाडवा साकारणारे वाक्मय आले आहे.
विद्याताईंचे विचार या गुढीच्या टोकावरचा तळपता तांब्या आहेत. समाजाचे रेशीमवस्त्र अखंड रहावे आणि सतत आनंदाने, आत्मभानाने सळसळते राहावे या जाणिवेला तोलून धरणारा!
विद्याताईंना आदराची, श्रद्धेची ओंजळ वाहण्यासाठी ‘आम्ही सारेजण’ आयुष्यभर कटीबद्ध आहोत !!!