मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
अर्थसंकल्पातून जिल्ह्यासाठी 530 कोटींची तरतूद, जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या होणार कायापालट
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण आणि महाराष्ट्राला विकासात्मक ताकद देणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. यात रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी तरतूद नसली तरीही रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय होणार, ही काळÎा दगडावरची रेघ आहे. यासाठी आवश्यक आराखडा सादर केला जाणार आहे. महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पातून जिह्याला 530 कोटींचा भरघोस निधी दिल्याचे मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी झूम मिटींगद्वारे सांगितले.
रत्नागिरी मेडिकल कॉलेज होणार नाही, अशी टीका करण्यास विरोधकांनी सुरूवात केली आहे. नेमकी परवानगी कोण देते, त्याचे निकष काय याचा अभ्यास ऍड. दीपक पटवर्धन यांनी करावा. हिंमत असेल तर टीका करणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन मेडिकल कॉलेजची परवानगी घेऊन यावे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. काही तांत्रिक त्रुटी असल्याने अर्थसंकल्पात समावेश झाला नसला तरीही स्पेशल केस म्हणून रत्नागिरीत मेडिकल कॉलेज होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणाचा पर्यटनदृष्ट्या कायापालट करण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे. रत्नागिरी भगवती बंदर येथे प्रुझ होणार असून यामुळे मुंबई-गोवा प्रुझमधून प्रवास करणारे पर्यटक भगवती बंदर येथे थांबतील व जवळपासच्या पर्यटन स्थळांची पाहणी करतील. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. हा प्रकल्प 100 कोटींचा असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्याला कौशल्य विकासासाठी 25 कोटी, यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद, नाणीज सिंचन प्रकल्पासाठी 93 कोटी निधींची तरतूद केली असून मारूती मंदिर परिसर कायापालट करण्यासाठी 1 कोटी, रस्त्यांच्या डागडुजीसाठी 5 कोटी तसेच नगरपालिका विकास निधी, धूपप्रतिबंधक कामे, मुरूगवाडा ते पांढरा समुद्र बंधाऱ्यांसाठी 189 कोटी 67 लाख निधीची तरतूद असून यापैकी 20 कोटी मंजूरही झाले आहेत. चाफे-गणपतीपुळे रस्त्यासाठी 26 कोटी 12 लाखांची तरतूद असून याशिवाय अनेक विकासकामे जिल्हÎात होणार आहेत. तरतूद झालेल्या कामांची अंमलबजावणी त्वरित करण्यात येणार असून 15 मे पूर्वी रस्ते चांगल्या स्थितीत उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क होणार पुण्यातील सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या धर्तीवर जिह्यात राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क होणार आहे. यासाठी 50 कोटींची तरतूद केली आहे. या ठिकाणी विविध विषयावर संशोधन करता येणार आहे. जिल्हÎातील विद्यार्थ्यांना अशा संशोधनासाठी अन्यत्र जावे लागणार नाही, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. |
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी 10 कोटींची तरतूद रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात अद्ययावत सोयीसुविधांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील 3 कोटी 70 लाख निधी प्राप्तही झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. |
–