जि.प.सीईओ संजयसिंह चव्हाण यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीतस्वच्छता ही सेवा' अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावागावात स्वच्छतेचे उपक्रम राबवून, शाश्वत स्वच्छतेसाठी जिह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.चे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. या अभियानात गावामध्ये श्रमदान उपक्रमा बरोबरच ग्रामपंचायती
हागणदारीमुक्त अधिक’ (ओ डी एफ प्लस) घोषित करण्यावर भर दिला आहे. अभियान कालावधीत गाव स्तरावर अभियानाबद्दल जाणीव जागृती होण्यासाठी स्वच्छतेचे विविध उपक्रम दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये पहिल्या टप्प्यात गावामध्ये प्रभात फेरी, सायकल रॅलीचे आयोजन करणे, विशेष व्यक्तींच्या उपस्थित स्वच्छता श्रमदान फेरी, स्वच्छता श्रमदान उपक्रम ( महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, शोष खड्डे, खत खड्डे यांचे बांधकाम करणे, प्लास्टिक गोळा करणे इत्यादी), पर्यावरण पूरक गणेश उत्सव मूर्ती व निर्माल्य संकलन करणे, श्रमदाना द्वारे संकलीत ओला कचरा व निर्माल्य व्यवस्थापन करणे, गावामध्ये एकदाच वापरात येणाया प्लास्टिक वर बंदी घालवणे व गाव ओ डी एफ प्लस घोषित करण्याची तारीख निश्चित करण्याचा ठराव करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्लॅस्टिक संकलन केंद्रे कार्यान्वित करणे, श्रमदानाव्दारे गावामध्ये संकलित केलेला ओल्या कच्रयाचे खड्डÎात व्यवस्थापन करणे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणांची स्वच्छता करणे, गावांमध्ये ` हागणदारीमुक्त अधिक’ स्वच्छता विषयक घोषवाक्य रंगविणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्राsतांची स्वच्छता करणे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, सर्व गावातील संकलित प्लास्टिक कचरा तालुका स्तरावर तात्पुरते संकलित करणे तसेच स्वच्छता सेनानीचा सत्कार केला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यांतर्गत 2 ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत दिवस उत्सव सर्व स्तरावर साजरा करणे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये संकल्प, शपथ घेणे, सर्व ग्रामपंचायतींनी पुढील प्रमाणे संकल्प करायचा आहे. यामध्ये कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरण करणे, वापरा व फेका प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू, थैल्या न वापरण। शोषखड्ड्याचे काम हाती घेणे, सेप्टीक टॅंक रिकामे करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
या याप्रमाणे स्वच्छता ही सेवा अंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात जिह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होणार असून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण होण्यासाठी, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.