हरमल वार्ताहर
यंदाच्या गणेशोत्सवातील पाच दिवसाच्या गणेश मूर्तीचे हरमल समुद्रकिनारी थाटात विसर्जन करण्यात आले.
यंदा कोविडचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात जाणवला.ग्रामस्थ भाविकांनी घरगुती गणेशमूर्ती संध्याकाळी 4 नंतर विसर्जन स्थळी नेण्यास सुरुवात केली.
विशेषतः मधलावाडा, चणई व कोरकणवाडा भागातील नागरिकांनी थोडय़ा थोडय़ा मूर्ती विसर्जनस्थळी आणल्या व सामूहिक गाऱहाणे घालून विसर्जन करण्यात आले. त्याठिकाणी साधारण 50 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते.
यंदाच्या विसर्जन सोहळय़ात भजन,घोषणा व दारुकामाची आतषबाजी तुरळक प्रमाणात दिसली.मात्र विसर्जनाच्या ठिकाणी फटाके अल्प प्रमाणात लावण्यात आले.
दरम्यान किनाऱयावर दृष्टीच्या जीवरक्षकांनी विसर्जनास मदत व टेहेळणी कार्य केल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.