प्रतिनिधी / रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे ट्रक-दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीवरील वडिलांसह मुलाचा मृत्यू झाल़ा तर महिला गंभीर जखमी झाली आह़े ही घटना 27 जानेवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास घडल़ी दरम्यान गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आह़े
राजेश महादेव धुमक (34) व त्यांचा मुलगा साईश राजेश धुमक (5, ऱा दोघेही हातखंबा झरेवाडी) तर राजेश यांची पत्नी ऋतुजा धुमक या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत़ दरम्यान या घटनेची नेंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े पोलिसांनी ट्रकचालक शेखर राजेश कोंडे (30, ऱा अहमदनगर ) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आह़े गुरूवारी त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक शेखर कोंडे हा ट्रकमध्ये (एमएच 42 टी 1301) साखरेची पोती घेवून कोल्हापूर ते रत्नागिरी असा येत होत़ा हातखंबा गाव येथे ट्रकचे बेक फेल झाल्याने ट्रकने राजेश धुमक यांच्या ताब्यातील दुचाकीचा जोरदार धडक दिल़ी यावेळी दुचाकीवरील राजेश धुमक, त्यांची पत्नी ऋतुजा व मुलगा साईश हे गंभीर जखमी झाल़े त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता राजेश यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी घोषित केल़े
तर ऋतुजा व साईश यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले होत़े दरम्यान कोल्हापूर येथे उपचारादरम्यान साईश याचा मृत्यू झाल़ा तर ऋतुजा यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक कोंडे याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केल़ा यावेळी ग्रामस्थांनी कोंडे याला ईश्वर धाब्याजवळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल़े