सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे जनता त्रस्त असतानाच विविध नियम व अटी लादून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुचाकीवर मागे बसणाऱया व्यक्तिलाही हेल्मेटसक्ती लागू केल्यास सर्वसामान्य जनतेला हेल्मेट खरेदी करावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे चार वर्षाच्या मुलाला देखील हेल्मेट परिधान करावे लागणार. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार असून हेल्मेटसक्तीला सर्वसामान्य जनतेतून तीव्र विरोध होताना दिसत आहे. हेल्मेटसक्ती झाल्यास विविध संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत देखील आहेत.
दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालण्याची सक्ती केल्यास बाजारहाटसाठी आलेल्या व्यक्तींनाही त्याचा मोठा त्रास होणार असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि त्यानंतरच हेल्मेट सक्ती लागू करावी, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
परिस्थिती पूर्वपदावर येईतोपर्यंत सरकारने हा निर्णय मागे घ्यावा
सरकारचा नियम जरी योग्य असला तरी आताच्या परिस्थितीत सर्वांना दंड भरणे, हेल्मेट खरेदी करणे अशक्मय आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात सरकारने हा कायदा सुरू केला आहे. सरकारी नोकरी करणाऱयांनाच अर्धा पगार दिला जातो. तर खासगी कंपनीत नोकरी करणाऱयांची परिस्थिती खालावलेली आहे. त्यांना स्वतःचे जगणे अवघड झाले आहे. तरी सरकारने सर्व स्थिती पूर्वपदावर येईतोपर्यंत निर्णय मागे घ्यावा, असे ते सांगतात.
सरकारने हेल्मेट उपलब्ध करून दिल्यास सोयीस्कर
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आम्हाला अर्धा पगार दिला जात आहे. वाहन चालविणाऱया व्यक्तीला हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिताचे आहे. पण मागे बसणाऱया व्यक्तीला सरकारने जर हेल्मेट दिले तर बरे होईल. कारण सध्या सर्वांची परिस्थिती बिकट आहे. सरकारने आधी स्मार्ट सिटीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. जनतेला सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मगच असे नियम लागू करावेत व दंड वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मागे बसणाऱयांनी हेल्मेट परिधान न केल्यास कारवाई करणार
मोटार वाहन कायदा 1988 नुसार कलम 129 मध्ये वाहनचालकाच्या मागे बसणाऱया व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच चार वर्षाच्या पुढील बालकालाही हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. सर्व वाहनधारकांचे हे कर्तव्य असून सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कलम 194-डी नुसार कारवाई झाल्यास आणि दंड न भरल्यास न्यायालय त्यांना हजार रुपये दंड करू शकते. तसेच तीन महिने वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येतो. त्यामुळे वाहन चालक व मागे बसणाऱयांनी हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.