प्रतिनिधी/ बेळगाव
तळमजल्यावरील विजेचे मीटर पावसाळय़ापूर्वी पहिल्या मजल्यावर बसविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला होता. त्यानुसार ज्या इमारतींमध्ये मीटर तळमजल्यावर आहेत त्यांना हेस्कॉमकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. मीटर दुसरीकडे बसवून घेण्यासाठी मुदत देण्यात आली असून मुदतीत मीटरचे स्थलांतर न करणाऱया इमारतींचा वीजपुरवठा सोमवारपासून बंद करण्यात येणार असल्याचा इशारा हेस्कॉमने दिला आहे.
मागील वर्षी पूरस्थितीमुळे शहरातील अनेक इमारतींमध्ये पाणी शिरले होते. तळमजल्यात पाणी भरल्याने विजेचे मीटर पाण्यात बुडाले होते. यामुळे 3 ते 4 दिवस इमारतींचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मीटर पाण्यात असल्यामुळे धोकादायक स्थिती होती. पाणी कमी झाल्यानंतर त्या इमारतींना वीजपुरवठा करावा लागला होता. त्यामुळे अशी परिस्थिती यावषी उद्भवू नये याकरिता जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी मीटर पहिल्या मजल्यावर बसविण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार हेस्कॉमच्या शहर विभागाकडून इमारती व ग्राहकांना नोटिसा पाठविल्या होत्या. शहरात एकूण 306 इमारती व ग्राहकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा देताच काही इमारतींच्या मालकांनी मीटर पहिल्या मजल्यावर बसवून घेतले आहेत. परंतु काही इमारतींच्या रहिवाशांमध्ये एकवाक्मयता नसल्यामुळे मीटर बसविण्यास वेळ होत आहे.
सोमवारपासून वीजपुरवठा करणार बंद
इमारतीधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. काही ग्राहकांनी त्यांचे मीटर पहिल्या मजल्यावर बसविले आहेत. पावसापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी हेस्कॉम प्रयत्नशील आहे. मागीलवषी प्रमाणे प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. नोटिसा देण्यात आल्या असून अद्याप मीटर स्थलांतर न केलेल्या ग्राहकांचा सोमवारपासून वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे, असा इशारा हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी दिला आहे.