4 वर्षांमध्ये सांप्रदायिक दंगलींचे 3,400 गुन्हे नोंद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2016-2020 दरम्यान झालेल्या सांप्रदायिक दंगलीच्या घटनांसंबंधी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत माहिती मांडली आहे. 2016-20 या कालावधीत देशात सांप्रदायिक दंगलींशी संबंधित 3,400 घटना नोंद झाल्या आहेत. तर मागील 10 वर्षांध्ये निमलष्करी दलांच्या 1,205 जवानांनी आत्महत्या केली असल्याचे राय यांनी म्हटले आहे.
2020 मध्ये सांप्रदायिक किंवा धार्मिक दंगलींचे 857 गुन्हे नोंद करण्यात आले. अशाचप्रकारे 2019 मध्ये 438 आणि 2018 मध्ये 512 तर 2017 मध्ये 732 आणि 2016 या साली 869 गुन्हे नोंद झाले आहेत.
मागील 10 वर्षांमध्ये 1,205 जवानांनी आत्महत्या केल्या असून यातील सर्वाधिक घटना 2021 मध्ये घडल्या आहेत. 2020 मध्ये 143 जवानांनी आत्महत्या केल्या. तर 2019 मध्ये हा आकडा 129, 2018 मध्ये 96 आणि 2017 मध्ये 125 राहिला होता. 2016 मध्ये 92 आणि 2015 मध्ये 108 तर 2014 मध्ये 125 जवानांनी स्वतःचे जीवन संपविले होते. 2013 मध्ये 113 आणि 2012 मध्ये 118 जवानांनी आत्महत्या केल्या होत्या. घरगुती समस्या, आजार आणि आर्थिक समस्या ही आत्महत्येची प्रमुख कारणे होती.