वाहतूकमंत्री गुदिन्हो यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोणत्याही प्रकारच्या अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्याला 2 लाख ऊपयांची भरपाई दिली जाणार असून, अर्ज केलेल्या सर्व अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना ही रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
परिवहनमंत्री गुदिन्हो म्हणाले, अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची नवीन सरलीकृत योजनेशी संबंधित फाईल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. चिखली येथे चिकलीम येथे सिमरन नावाच्या व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने त्यांनाही योजना देण्याबाबत विचार झाला आहे. त्यामुळे यापुढे आता सर्व प्रकारच्या अपघातातील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना 2 लख ऊपये परिवहन खात्यामार्फत दिले जातील, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.