दिल्ली येथील दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा
मिरज प्रतिनिधी
तालुक्यातील सोनी येथील शेतकऱ्याकडून द्राक्ष खरेदी कऊन दिल्ली येथील दोघा व्यापाऱ्यांनी सुमारे 25 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अनिल अर्जून नऊटे (वय 39) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित शिवकुमार व बाबा उर्फ अनिलकुमार अशा दोघा व्यापाऱ्यांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल नऊटे हे द्राक्षबागायतदार आहेत. त्यांनी आपल्या बागेतील सुमारे 50 लाख रुपयांची द्राक्षे दिल्लीतील व्यापारी शिवकुमार व अनिल कुमार यांना विक्री केली होती. संबंधित व्यापाऱ्यांनी यातील 25 लाख रुपये दिले होते. उर्वरीत 25 लाख रुपये दिल्ली येथे गेल्यानंतर पाठवतो, असे सांगितले होते. मात्र, आठ महिने झाले तरीही संबंधित व्यापाऱ्यांनी उर्वरीत पैसे दिले नाहीत.
नऊटे यांनी वारंवार पैशांची मागणी कऊनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांचे मोबाईलही बंद झाले.आपली फसवणूक झाल्याची बाब नऊटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष करून व्यापाऱ्यांकडून द्राक्षबागायतदारांना गंडा घातला जात आहे. अशा भामट्या व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांनी सावध रहावे. ओळखीच्या व्यापाऱ्यांनाच आपला माल द्यावा. फसवणुकीची शक्यता वाटल्यास पोलिसांकडे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.