निवडणूक आयोगाचा निर्णय- आसाममधील मतदान केंद्रे
आसाममध्ये दुसऱया टप्प्यातील मतदान एक एप्रिल रोजी पार पडले होते. या टप्प्यातील 4 मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग पुन्हा मतदान करविणार आहे. 1 एप्रिल 2021 रोजी चार मतदान केंद्रांवर झालेले मतदान शून्य ठरविण्यात यावे असा निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. याचबरोबर आयोगाच्या निर्देशांनुसार संबंधित मतदान केंद्रांवर नव्याने 20 एप्रिल रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करविण्यात येणार आहे.
भाजप उमेदवाराच्या पत्नीशी संबंधित कारमध्ये ईव्हीएम मिळाल्यावर रताबाडी (राखीव) विधानसभा मतदारसंघातील इंदिरा एमव्ही शाळेत मतदान केंद्र क्रमांक 149 पुन्हा मतदान करविण्यात येणार असल्याचे आयोगायच आदेशात म्हटले गेले आहे.
हाफलोंग मतदारसंघातील कोठलिर एलपी शाळेत मतदान केंद्र क्रमांक 107 (अ) 90 मतदारच नोंदणीकृत होते, पण तेथे एकूण 171 मते पडली होती. सोनाई विधानसभा मतदारसंघातील मध्य धनेहोरी एलपी शाळेत मतदान केंद्र 463 येथेही नव्याने मतदान करविण्याचा आदेश देण्यात आला आहे. येथे गोळीबाराच्या घटनेत किमान 3 जण जखमी झाले होते.