टीसीएस, विप्रो, इन्फोसिसचा समावेश – 2021-21 वर्षाकरीता होणार भरती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 5 आयटी कंपन्यांकडून 96 हजार जणांची भरती करून घेतली जाणार असल्याची माहिती नॅस्कॉम या संस्थेने दिली आहे.
बँक ऑफ अमेरिकेच्या माध्यमातून नॅसकॉमने ही माहिती दिली आहे. 2022 पर्यंत ऑटोमेशनमुळे भारतातील आयटी कंपन्या 30 लाख जणांना नोकरीतून कमी करणार असल्याचे म्हटले होते. माहिती-तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये वृद्धी होत असून रोजगार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. यासाठी नव्या उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 1 लाख 38 हजार जणांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 96 हजारहून अधिक जणांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती करण्यासंबंधीची योजना तयार करण्यात आली आहे. ऑटोमेशनच्या माध्यमातून नोकऱयांची कपात केली जाणार असून यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आणि कॉग्नीझेंट सारख्या कंपन्यांचाही सहभाग असणार असल्याचे बोलले जात आहे.