येत्या महिन्याभरात 15 ते 16 हजार कामगारांना काम देण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही वर्षे उद्योग खात्रीमध्ये जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षाही अधिक कामे केली होती. मात्र आता मागील दोन वर्षांपासून सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच धडपड सुरू झाली आहे. तालुक्यातही बऱ्यापैकी कामगारांना कामे देण्यावर भर दिला जात आहे. सध्या तालुक्यात 8 हजार कामगारांना काम देण्यात येत असून लवकरच ही संख्या 15 ते 16 हजारांवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
मागील चार वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये ग्राम पंचायतींनी उत्स्फूर्तपणे विविध कामे करून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या उद्योग खात्री योजनेचा लाभ घेत आहेत. आता मात्र रोजगारांना कामे कोणती द्यावी या विवंचनेतच अनेक तालुका पंचायत अधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामगार संख्याही वाढविण्याकडे भर दिला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात तालुक्यात 15 ते 16 हजार कामगारांना काम देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
गावपातळीवर विकास व्हावा यासाठीच योजना राबविणार
केंद्र सरकारने महात्मा राष्ट्रीय ग्रामीण उद्योग सुरू केला आहे. तो प्रभावीपणे राबविला जात आहे. त्यामुळे देशभरातच याचा गवगवा होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान 2022-23 या वर्षांकरिता उद्योग खात्री योजनेंतर्गत तालुक्यात कामांना चालना देण्यात आली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुक्यातील कामगारांना मोठ्या प्रमाणात काम देवून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्रीतर्फे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व गावपातळीवर विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे.
कामगार वर्गातून समाधान
उद्योग खात्री योजनेतून विविध तलाव, स्वच्छ भारत अभियान, रस्ते, गटारी यासह इतर कामांचा या योजनेत समावेश आहे. मात्र तालुका जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न होत असताना, गटारी आणि इतर कामे करण्यावर भर दिला जात आहे. काही गावातील रोजगार तर बाहेरच्या ग्राम पंचायत हद्दीत कामे करण्यास तयार झाले आहेत. मात्र त्या ठिकाणीही हीच परिस्थिती असल्यामुळे रोजगार हमी योजनेतून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध कसा करून द्यावा? हाच प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान आता तालुक्यातील कामांना चालना देण्यात आल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.