वार्ताहर/ रामनगर
जोयडा तहसीलदार संजय कांबळे यांनी चांदवाडी ब्रीजची पाहणी केली. गावातील संपर्क तुटल्याने येथील लोकांना ये-जा करण्यासाठी गरज भासल्यास बोटची व्यवस्था केली असून कशा प्रकारे समस्या सोडवता येतील, याबद्दल पाहणी करण्यात आली. सदर बोट जिल्हाधिकारी यांच्यामार्फत असू ग्राम पंचायतला हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदर बोटीचा उपयोग अत्यंत महत्त्वाच्या वेळीच करावा, असे सांगण्यात आले. या वेळी जि. पं सदस्य संजय हणबर, असू ग्राम पंचायत अमरिश, मारुती पाटील, प्रभाकर गावडे आदी उपस्थित होते.