दिवसात 45,892 नवे रुग्ण : 44,291 जणांची कोरोनावर मात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याने धोका अद्याप कमी न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उपचाराअंती बरे होणाऱया रुग्णांपेक्षा नव्या बाधितांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 45 हजार 892 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 817 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 44 हजार 291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतात सध्या 4 लाख 60 हजार 704 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकंदर 4 लाख 5 हजार 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या वाढून 3 कोटी 7 लाख 9 हजार 557 इतकी झाली आहे. एकंदर रुग्णांपैकी 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाली असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत फारशी घट झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी चाळीस हजारांखाली गेलेली दिवसभरातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. तसेच मृत्यूसंख्या स्थिर पातळीवर घुटमळत आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्मयांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 2 टक्क्मयांनी घटली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांची संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱया स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. दरम्यान, 7 जुलैपर्यंत देशभरात 36 कोटी 48 लाख कोरोना व्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 42 कोटी 52 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.