कामगार मिळत नसल्याने मोठी अडचण : दिवसाला आवश्यक आहेत बाराशे कामगार
प्रतिनिधी /पणजी
येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जुवारी पुलाची किमान एक बाजू तरी चालू करून त्यावरून वाहतूक पुढे चालू करण्याचे जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणे हे या सरकारला आता शक्मय होईल, असे वाटत नाही. येत्या 19 डिसेंबरपर्यंत पुलाची एक लेन चालू करणे आता पूर्णतः अशक्मयप्राय झाले आहे.
जुवारी पुलाचे बांधकाम माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये करण्यात आले होते. हा पूल इसवी सन मार्च 2021 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते तथापि, कोरोना महामारीमुळे कामगार विस्थापित झाले आणि ते आपापल्या गावी परतले. यामुळे या पुलाचे बांधकाम मंदगतीने चालू करणे कंत्राटदाराला भाग पाडले.
दररोज हवेत बाराशे कामगार
आता प्रत्यक्षात पुलाच्या बांधकामासाठी दिवसाकाठी किमान बाराशे कामगारांची आवश्यकता आहे. सध्या त्या ठिकाणी केवळ तीनशे कामगार काम करीत आहेत. गोवा सरकारने सदर पुलाची किमान एक बाजू चालू करण्याचे ठरविले होते आणि त्यासाठी कंत्राटदाराला 19 डिसेंबरपूर्वी या भागाचे बांधकाम पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू करता यावी यासाठी सरकारने उद्दिष्ट दिले होते. कोरोना महामारी च्या दुसऱया लाटेमुळे मोठय़ा प्रमाणात कामगार माघारी परतले आणि त्यामुळे सध्या कंत्राटदाराला काम करण्यात अडथळे निर्माण झाले. वेळेत बांधकाम पूर्ण करता येणे अशक्मय बनले आहे. परिणामी मार्च 2022 पर्यंत देखील पुलाची एक बाजू पूर्ण होणे अशक्मय आहे. मे 2022 मध्ये झुवारी ची एक बाजू वाहतुकीस खुली होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी झुवारी पूलसंदर्भात अभियंत्यांची एक महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीला कंत्राटदार अधिकाऱयांना देखील बोलविण्यात आले होते. त्यांनी वस्तुस्थिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांसमोर मांडली आणि कामगार अभावी एवढय़ात जेवढे काम पूर्ण होणे आवश्यक होते त्यापेक्षा निम्मे झालेले आहे हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे नदीमधील मुख्य पुलाचे बांधकाम हे पूर्ण होण्यास डिसेंबर 2022 उजाडणार आहे. त्यामुळे विद्यमान सरकारला, जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणे शक्मय होणार नाही निवडणुकी पूर्वी पुलाची एक बाजू तरी पूर्ण व्हावी यासाठी सरकार कंत्राटदारावर दबाव आणीत आहे.