प्रथमच मारली मुलांनी बाजी
कोल्हापूर विभागात सांगली अव्वल, 39 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण, तर अवघे 20 विद्यार्थी अनुत्तीर्ण
प्रतिनिधी / सांगली
कोरोनामुळे रद्द केलेल्या दहावीच्या परीक्षेचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल 99.94 टक्के लागला असून कोल्हापूर विभागात सांगली जिल्हा अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 39 हजार 631 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यापैकी 39 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर अवघे 20 विदयार्थी अनुर्त्तीण झाले.
दरम्यान, निकाल ऑनलाईन जाहीर केला असला तरी वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचाही विरस झाला. दिवसभर प्रयत्न करुनही निकाल उशीरापर्यंत पाहत न आल्याने `वेबसाईट क्रॅश, विद्यार्थी निराश’ अशी स्थिती दिसून आली.
राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला. कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के लागला असून सांगली जिह्याचा सर्वाधिक 99.94 टक्के लागला. तर सातारा 99.92 आणि कोल्हापूरचा 99.90. टक्के आहे. कोल्हापूर विभागात सांगली जिह्याने पहिला क्रमांक पटकाविला. जिल्ह्यातील 649 शाळांतील 39631 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. या सर्वच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले. नववी आणि दहावीतील अभ्यासक्रमाच्या आधारे केलेल्या अंतर्गत मूल्यमापनानुसार 39 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथमच मारली मुलांनी बाजी
मागील काही वर्षांपासून दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र यंदा मुलांनी बाजी मारल्याचे अंतर्गत मूल्यमापन निकालातून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 21701 मुलांपैकी 21693 जण उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाण 99.96 टक्के आहे. आणि 17930 मुलींपैकी 17918 उत्तीर्ण झाल्या. मुलींचे पास होण्याचे टक्केवारी 90.93 टक्के आहे.
पुनर्परीक्षार्थीचा निकाल 84.94 टक्के
जिल्ह्यातून 2867 पुनर्परीक्षार्थींची नोंदणी झाली होती. त्यापैकी 1441 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्या सर्वच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले असून 1224 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 84.94 आहे. निकालासाठी 100 गुणांपैकी 50 टक्के गुणांचे वेटेज अंतर्गत मूल्यमापन तर 50 टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देवून मूल्यमापन केले. अंतर्गत मूल्यमापनासाठी 30 टक्के गुण, प्रात्यक्षिक 20 टक्के आणि नववीत मिळालेल्या गुणांसाठी 50 टक्क्मयांचे वेटेज या सुत्रानुसार निकाल जाहीर झाला आहे.