प्रतिनिधी / सांगली
सांगली आणि मिरजेतील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सांगलीवाडी व कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी २ बोट व रेस्क्यू टिम तैनात करण्यात आली आहेत. या टीमकडून नागरिकांसाठी मदतकार्य आणि बचाव कार्य केले जाणार आहे. यासाठी सांगली आणि मिरजेत अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, आपत्ती मित्र कार्यरत आहेत.
कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली शहरात 49 पर्यंत पोहचल्यानंतर ज्या नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जात आहे आणि नागरिकांना बाहेर पडणेची अडचण होत आहे. त्यामुळे सांगली शहर आणि सांगलीवाडीमध्ये 2 आणि मिरज कृष्णा घाट परिसरात 2 अशा रेस्क्यू टीम बोटीसहित तैनात केल्या आहेत.