सांगली/ प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ रात्री आठ पर्यंत करणार परंतु ज्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही त्या जिल्ह्यात निर्बंध कडकच राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगलीत बोलताना केली.
राज्यासह देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या ओटीपोट ऑक्सिजन तिसर्या लाटेत लागण्याची शक्यता आहे. यापार्यांच्या धमकी पेक्षा आपल्याला जीव वाचविणे महत्त्वाचे आहे त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महापुराचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती नेमणार, तसेच आज पर्यंत नेमलेल्या सर्व अभ्यास समित्यांचे अहवाल पुन्हा खुले करून महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यावेळी केली. महापुराचे संकेत वारंवार येत असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पूरस्थिती पाहण्यासाठी सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला