मधुमेह (डायबेटीस) हा असा विकार आहे की तो एकदा लागला की जन्मभराचा साथीदार असतो. औषधांमुळे तो नियंत्रणात ठेवता येतो. तथापि, कधीही पूर्ण बरा करता येत नाही, अशी आजवरची समजूत आहे. तथापि उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील डॉक्टर राम मनोहर लोहिया संस्थानात झालेल्या प्रयोगानुसार काही आयुर्वेदिक वनस्पतीच्या साहाय्याने मधुमेह बरा करता येतो, असे दिसून आले आहे. या वनस्पतींवर आणखी प्रयोग होत आहे.
ज्यांची साखरेची पातळी 500 हून अधिक आहे, त्यांनाही या औषधांचा चांगला परिणाम अनुभवास येत आहे. केवळ दोन ते तीन महिने उपचार घेतल्यानंतर त्यांची साखरेची पातळी 150 च्या खाली आलेली आहे. तसेच 20-20 वर्षे इन्सुलिन घ्यावे लागलेल्या रुग्णांचे इन्सुलीन थांबलेले आहे. मधुमेह या औषधांमुळे पूर्ण बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन संशोधक डॉ. एस. के. पांडे यांनी केले.
कालमेघ, जांभुळ, आंब्याची कोय, पुनर्नवा, गोखरु, अश्वगंधा, अर्जुनवृक्षांची साल, गुडमार इत्यादी वनस्पतींच्या मिश्रणातून हे औषध बनविण्यात आले आहे. यामुळे केवळ मधुमेह बरा होतो असे नाही. तर मधुमेहांमुळे झालेली इतर शारीरिक हानीही भरुन निघण्यास सहाय्य होते, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. अर्थात या औषधाचा उपयोग केवळ ही माहिती वाचून करू नये, वैद्यकीय सल्ल्यानुसारच तो केला पाहिजे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.