प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात विकासकामे राबविण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी अर्धवट काम ठेवल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. येथील शहापूर पोलीस स्थानकासमोर पथदिपांच्या विद्युत वाहिन्या घालण्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महिना उलटला तरी संबंधित विभागाने येथील काम पूर्णत्वास नेण्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काम अर्धवट स्थितीत असल्याने या ठिकाणी वर्क इन प्रोगेस असा फलक लावण्यात आला आहे. मात्र कित्येक दिवस उलटले तरी येथील काम अर्धवट असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. येथील अर्धवट पेव्हर्स घातलेल्या ठिकाणी अनेकजण अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडण्याआधी येथील काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.