दोडामार्ग – वार्ताहर-
कळणे मायनिंग मधील पाण्याचा बांध फुटून झालेल्या जलप्रलयात कळणेतील शेतकरी – ग्रामस्थांच्या घराचे व शेती बागायतीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून सध्या फक्त घरांच्या नुकसानीचे संबधित मायनींग कंपनीने 12 लाख रुपये नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा केले आहेत अशी माहिती तहसीलदार अरुण खानोलकर यांनी दिली.
गेल्या महिन्यात कळणे मायनींग मधील पाण्याचा बांध फुटून तेथील माती मिश्रीत पाणी परिसरातील शेतकरी ग्रामस्थ यांच्या शेती बागायतींचा व घरांनी घुसले. आणि अतोनात हानी झाली. यामध्ये काजू, नारळ, सुपारी, भात आदी पिकांसोबत घरादारात पाणी व माती गेल्याने अनेक जीवनाश्यक वस्तू यांची अतोनात हानी झाली. त्यातील घरांच्या नुकसानीची भरपाई मायनींग कंपनीकडून देण्यात आली आहे असे श्री. खानोलकर यांनी सांगितले ही रक्कम संबधित शेतकरी – ग्रामस्थांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे असेही श्री. खानोलकर म्हणाले.
फोटो –