मुंबई/प्रतिनिधी
तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा केला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिक देश सोडण्यासाठी पळापळ करत आहेत. विमानतळावर गर्दी होत आहे. काबुल विमानतळ अमेरिकेने ताब्यात घेतल्यामुळे देश सोडण्यासाठी नागरिकांकडे काबुल विमानतळ हा एकच पर्याय उरला आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून लाखो नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली आहे. देश सोडून जाणाऱ्या अफगाणी नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांविषयी जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील संकटावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अफगाण मुली आणि स्त्रियांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जात असून इथल्या संघर्षाची सर्वाधिक किंमत येथील निष्पाप नागरिकांना मोजावी लागत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील संकटावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर यांनी अमेरिका ही कोणत्या प्रकारची महाशक्ती असल्याचं म्हणत निशाणा साधलाय. तर, अफगाणिस्तानमध्ये येत्या काळात महिला केवळ लैंगिक गुलाम आणि मुलं जन्माला घालण्यापुरत्याच उरतील, अशी भीती तस्लिमा नासरीन यांनी व्यक्त केली आहे.
तर जावेद अख्तर यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. “अमेरिका जर तालिबान नावाच्या या रानटी लोकांचा नायनाट करू शकत नसेल तर तो कोणत्या प्रकारचा महाशक्ती देश आहे? जर त्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलं आहे. मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे.” असं म्हटलंय. त्यांनी अमेरिकेवर टीका करताना तुम्ही कोणत्या प्रकारची महाशक्ती आहात, असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच अफगाणी स्त्रियांच्या हक्काबाबतही विचारणा केली असून मानवाधिकारांचे रक्षणकर्ते म्हणवणाऱ्या पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे, असं त्यांनी सुनावलं आहे.