प्रतिनिधी / मुंबई
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पुरामुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांना अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी जिल्हा सहकारी बँका पुढाकार घेणार आहेत. त्याचा फायदा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिह्यातील बाधित व्यावसायिकांना होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील अतिवफष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पुढाकार घेतला आहे. ना-नफा तत्वावर 5 ते 6 टक्के या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या आपत्तीतून त्यांना सावरण्यासाठी पूरबाधित जिल्हÎातील जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ना-नफा तत्वावर भांडवल उभारणीसाठी खर्चापेक्षा (कॉस्ट ऑफ फंड) थोडÎा अधिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.