प्रतिनिधी / शाहुवाडी
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी व कडवी खोऱ्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हितासाठी कडवी नदीच्या पुर्नजिवणाचे काम नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून करू अशी ग्वाही नाम फाउंडेशनचे संचालक मल्हार पाटेकर यांनी दिली. आंबा ते मलकापूर या दरम्यान महामार्गाशी समांतर वाहणाऱ्या कडवी नदीची स्वच्छता व रूंदीकरण करणारी मोहीम हाती घेतली आहे. अरूंद पात्र व गवताने झाकल्याने दरवर्षी नदीचे पाणी शिवारातून रस्त्यावर येते. यावर्षी मलकापूर ते आंबा दरम्यान आठ ठिकाणी पाणी कोल्हापूर रत्नागिरी महार्गावर आले होते.
तीन दिवस महागार्ग बंद होता. तर शिवारे व कडवी खोऱ्यातील वीज पोल आठ दिवस पूरात राहीले.सहा ठिकाणी डोंगराचे भूस्खलन झाल्याने दरड नदीला मिळाली आहे. या प्रसंगी इंद्रजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती . नदीस्वच्छतेचे तेरा किलोमीटर पैकी चार किलोमीटरचे काम यापूर्वी शेतकरी व निसर्ग प्रेमीतून सहभागातून झाले आहे. उरवरीत पात्रातील गाळ व गवत काढून आवश्यक ठिकाणी रूंदीकरण करण्याची मोहीम कडवी नदी पुर्नजिवन समितीने हाती घेतली आहे. त्यासाठी नाम फाउंडेशन योगदान देईल.असा विश्वास इंद्रजित देशमुख यांनी समिती सदस्यांना दिला. आज सकाळी नाम फाउंडेशन निळे,वारूळ व तळवडे या ठिकाणी भेटी देऊन नदी पात्राची सद्यस्थिती समजून घेतली.
महामार्गावर पूर येणार नाही. तसेच नदी शेजारील विज यंत्रणा, पिक व शिवाराची हाणी होणार नाही याची दक्षता घेवून मोहीमेचा आराखडा बनवण्यात आलेचे मोहीम प्रमुख राजेंद्र लाड यांनी फाउंडेशनपुढे भूमिका मांडली. यावेळी नाम फाउंडेशनचे मुख्य समन्वयक गणेश थोरात, रामदास निकम (सातवे) तसेच शिराज शेख (वारूळ )संदिप पाटील व दिलीप शिंदे( चांदोली) सोसायटी अध्यक्ष गणेश पाटील ( केर्ले) उपसरपंच बाबासाहेब जाधव, मोनेरा अजिंक्य बेर्डे, विनायक हिरवे अशोक कुंभार आदी उपस्थित होते.