अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 31 ऑगस्ट 21, सकाळी 10.45
●सोमवारी दिवसभरात 416 बाधित
●आता उपचारार्थ रुग्णांचा आकडा चुकतोय
●कोरोनामुक्ती 112 टक्क्यांवर
●सलग तिसऱ्या दिवशी वाढ पाचशेच्या खाली
●एकूण 10, 328 जणांच्या तपासणी
सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, पुणे विभाग राज्यात अजूनही हॉटस्पॉट आहे. बाधितांचे आकडे वाढले तर त्याला जनता दोषी ठरते तर मग अद्याप सातारा जिल्ह्याचा मृत्यू दर हा 4.93 टक्के इतका जास्त आहे. त्याला प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच जबाबदार आहे. मृत्यू दर कमी करण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले असून, त्याकडे सगळं लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात आठवडा झाला मृत्यू दर हा शून्य करण्यात यश आले आहे. दरम्यान, सोमवारी 416 इतके बाधित आले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी बाधित वाढ पाचशेच्या खाली राहिली असल्याचा दिलासा आहे.
ऑगस्टचा दुसरा पंधरवडा आलेख खाली आणणारा
गेल्या 15 दिवसांत एकूण 8 हजार 294 जण बाधित झाले आहेत तर 9 हजार 329 मुक्त झाल्याने मुक्ती दर 112.47 टक्के झाला आहे. मात्र याच पंधरवड्यात 409 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यू दर 4.93 टक्के इतका जास्त राहिला आहे. जेंव्हा सर्व निर्बंध शिथिल केले असताना दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर पूर्णतः लक्ष केंद्रित करण्याची गरज असताना प्रशासन ही एकमेव अत्यंत आवश्यक जबाबदारी झटकू पहात आहे.
सोमवारी अहवालात 416 बाधित
सोमवारी आलेल्या अहवालानुसार एकूण 10,328 जणांचे तपासणी करण्यात आल्यानंतर 416 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. शनिवार, रविवार, सोमवार अशी सलग तिसऱ्या दिवशी बाधित वाढ 500 च्या खाली राहिली असून याचा मोठा दिलासा नागरिकांना लाभला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 17,87,280
एकूण बाधित 2,39,092
एकूण कोरोनामुक्त 2,26,907
मृत्यू 6,012
उपचारार्थ रुग्ण 9,529
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 469
मुक्त 633
मृत्यू 04